लाच घेणाऱ्या अभियंत्यावर कारवाई

नालासोपारा (वार्ताहर) :वसईत असलेल्या औद्योगिक गाळ्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी एका अभियंत्याने लाच मागितली असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच अँटी करप्शन ब्युरो यांनी सापळा रचून या अभियंत्याला अटक केली आहे. अभियंत्याने ८४ हजार रुपयांची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.

वसईच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या औद्योगिक गाळ्यांमध्ये विद्युत यंत्रणा जोडण्यासाठी निरीक्षण करून त्याठिकाणी जोडणी देण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या अभियंता राजू गीते याने लाच घेतल्याचे समोर आले आहे. अभियंता राजू गीते (५७) सोबतच त्याच्या साथीदाराला बुधवारी अँटी करप्शन ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे.

वसईत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विद्युत जोडणी करणे योग्य आहे, त्याचे फिटनेसचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या वालीव शाखेच्या अभियंत्याने तब्बल वीस गाळ्यांच्या मालकांकडून ९०,००० रुपयांची मागणी केली होती. प्रत्येक गाळ्याच्या मालकाकडून ४,५०० रुपयांची मागणी केली होती. परंतु नव्वद हजारी मोठी रक्कम असल्याने अखेर ८४,००० घ्यायचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी राजू गीते यांनी आपल्या साथीदाराला सागर गोरड (२९) याला पाठवले. रक्कम घेतल्यानंतर सागर याने राजू गीते यांना फोनवरून हे संपूर्ण गोष्टीची माहिती दिली. परंतु, तक्रारदाराने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरो ने राजू गीते आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ