लाच घेणाऱ्या अभियंत्यावर कारवाई

नालासोपारा (वार्ताहर) :वसईत असलेल्या औद्योगिक गाळ्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी एका अभियंत्याने लाच मागितली असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच अँटी करप्शन ब्युरो यांनी सापळा रचून या अभियंत्याला अटक केली आहे. अभियंत्याने ८४ हजार रुपयांची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.

वसईच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या औद्योगिक गाळ्यांमध्ये विद्युत यंत्रणा जोडण्यासाठी निरीक्षण करून त्याठिकाणी जोडणी देण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या अभियंता राजू गीते याने लाच घेतल्याचे समोर आले आहे. अभियंता राजू गीते (५७) सोबतच त्याच्या साथीदाराला बुधवारी अँटी करप्शन ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे.

वसईत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विद्युत जोडणी करणे योग्य आहे, त्याचे फिटनेसचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या वालीव शाखेच्या अभियंत्याने तब्बल वीस गाळ्यांच्या मालकांकडून ९०,००० रुपयांची मागणी केली होती. प्रत्येक गाळ्याच्या मालकाकडून ४,५०० रुपयांची मागणी केली होती. परंतु नव्वद हजारी मोठी रक्कम असल्याने अखेर ८४,००० घ्यायचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी राजू गीते यांनी आपल्या साथीदाराला सागर गोरड (२९) याला पाठवले. रक्कम घेतल्यानंतर सागर याने राजू गीते यांना फोनवरून हे संपूर्ण गोष्टीची माहिती दिली. परंतु, तक्रारदाराने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरो ने राजू गीते आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात