कुलगुरूंसाठीची शिफारस आता राज्य सरकारकडून

  122

मुंबई (विशेष प्रतिनिधी)- राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नेमणुकीचे राज्यपालांकडे असलेले अधिकार काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यपाल विरूदध सरकार, असा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक राज्यपाल करतात. यासाठी राज्यपालांनी तज्ज्ञांची एक शिफारस समितीही नेमली आहे. पण, सरकारला या नियुक्त्या मान्य असल्याचे दिसत नाही. सरकारने यापुढे सरकारने शिफारस केलेल्या व्यक्तीचीच राज्यपालांनी नियुक्ती करावी, असा कायदा करण्याचे ठरवले आहे. त्याचसोबत कुलपतींबरोबरच एक प्रकुलपती पद निर्माण करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.


अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानानेच


राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फुटल्याचा धक्का बसल्यानंतर आता पुन्हा त्याची प्रचिती घ्यावी लागू नये, म्हणून राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला. याकरीता नियमात आवश्यक तो बदल करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही