मुंबई (विशेष प्रतिनिधी)- राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नेमणुकीचे राज्यपालांकडे असलेले अधिकार काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यपाल विरूदध सरकार, असा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक राज्यपाल करतात. यासाठी राज्यपालांनी तज्ज्ञांची एक शिफारस समितीही नेमली आहे. पण, सरकारला या नियुक्त्या मान्य असल्याचे दिसत नाही. सरकारने यापुढे सरकारने शिफारस केलेल्या व्यक्तीचीच राज्यपालांनी नियुक्ती करावी, असा कायदा करण्याचे ठरवले आहे. त्याचसोबत कुलपतींबरोबरच एक प्रकुलपती पद निर्माण करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फुटल्याचा धक्का बसल्यानंतर आता पुन्हा त्याची प्रचिती घ्यावी लागू नये, म्हणून राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला. याकरीता नियमात आवश्यक तो बदल करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (SRA scheme) घरांच्या विक्रीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आता ऑनलाइन देण्यात…
वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून…
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी तंबाखू (tobacco) वापरकर्त्यांसाठी…
९ विद्यार्थी जखमी रायगड : आज सकाळी कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) हातकणंगले येथे सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या…
नेमकं काय घडलं होतं तेव्हा? पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) ड्रग्जमाफिया ललित पाटील…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंना पण भोंदूबाबा म्हणायचंय का? आमदार नितेश…