नववर्षात घराचे स्वप्न होणार साकार

नवी मुंबई (प्रतिनिधी): सिडकोकडून नवीन वर्षात महागृहनिर्माण योजना राबवण्यात येणार असून आणखी पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात 'महागृहनिर्माण योजने'अंतर्गत या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे नवी मुंबईत हक्काचे घर घेण्यासाठी अनेकांना नवी संधी पुन्हा चालून आली आहे.


या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत. सिडकोने आतापर्यंत अनेक गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आपले हक्काचे घर घेता आले आहे. 'परवडणारी घरे' या संकल्पनेनुसार सिडकोने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी योजना राबवली असून त्यातून अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले आहे. याच अंतर्गत आता नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, सिडकोच्या वतीने महागृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे. यामध्ये पाच हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री