रिक्षा भाडे कपातीस रिक्षा संघटनाचा विरोध

बदलापूर : ९ डिसेंबरपासून कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शेअर रिक्षाचे किमान भाडे नऊ रुपये केल्याने या नवीन दरपत्रकावर रिक्षा संघटना नाराज आहेत. सर्वेक्षण न करताच ही भाडे कपात केल्याचा आरोप रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यानी केला आहे.



याबाबत रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग खजिनदार अविनाश खिलारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता रिक्षाचे किमान भाडे ९ रुपये हे फारच कमी असून ते १२ ते १५ रुपये तरी असायला पाहिजे, असे खिलारे यांचे म्हणणे आहे. तसेच कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्वेक्षण करताना रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पालिकेचे अभियंता, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह शेअर रिक्षा मार्गांचे सर्वेक्षण करून त्यानंतर शेअर मार्गाचे दर निश्चित करायला हवे होते व त्यानंतर याबाबत सूचना हरकती मागवून हे दर अंतिम करायला पाहिजे होते. मात्र, असे न करताच रिक्षा शेअर मार्गाचे दर निश्चित करण्यात आले असल्याचा आरोप अविनाश खिलारे यांनी केला.



त्यामुळे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केलेल्या या दरांबाबत रिक्षाचालकांमध्ये नाराजी असून महासंघाच्या वतीने पुन:सर्वेक्षण करून नव्याने दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती खिलारे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण