रिक्षा भाडे कपातीस रिक्षा संघटनाचा विरोध

बदलापूर : ९ डिसेंबरपासून कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शेअर रिक्षाचे किमान भाडे नऊ रुपये केल्याने या नवीन दरपत्रकावर रिक्षा संघटना नाराज आहेत. सर्वेक्षण न करताच ही भाडे कपात केल्याचा आरोप रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यानी केला आहे.



याबाबत रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग खजिनदार अविनाश खिलारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता रिक्षाचे किमान भाडे ९ रुपये हे फारच कमी असून ते १२ ते १५ रुपये तरी असायला पाहिजे, असे खिलारे यांचे म्हणणे आहे. तसेच कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्वेक्षण करताना रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पालिकेचे अभियंता, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह शेअर रिक्षा मार्गांचे सर्वेक्षण करून त्यानंतर शेअर मार्गाचे दर निश्चित करायला हवे होते व त्यानंतर याबाबत सूचना हरकती मागवून हे दर अंतिम करायला पाहिजे होते. मात्र, असे न करताच रिक्षा शेअर मार्गाचे दर निश्चित करण्यात आले असल्याचा आरोप अविनाश खिलारे यांनी केला.



त्यामुळे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केलेल्या या दरांबाबत रिक्षाचालकांमध्ये नाराजी असून महासंघाच्या वतीने पुन:सर्वेक्षण करून नव्याने दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती खिलारे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम