आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

दुबई (वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला वनडे वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताची सलामी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ६ मार्चला होईल. यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढतीने (४ मार्च) विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होईल.


न्यूझीलंडमध्ये ३१ दिवस रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे ३० मार्च रोजी तसेच दुसरा उपांत्य सामना ३१ मार्चला होईल. विजेतेपदाचा सामना ३ एप्रिलला रंगेल. अंतिम लढत ख्राइस्टचर्चवर होईल. वर्ल्डकप स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, जिथे प्रत्येक संघाला इतर प्रत्येक संघाशी स्पर्धा करावी लागेल आणि गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.


ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०१७-२० मधील त्यांच्या स्थानांनुसार वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. यजमान असल्यामुळे न्यूझीलंड संघ आपोआप पात्र ठरला.




भारताच्या लढती


६ मार्च वि. पाकिस्तान टौरंगा
१० मार्च वि. न्यूझीलंड हॅमिल्टन
१२ मार्च वि. वेस्ट इंडिज हॅमिल्टन
१६ मार्च वि. इंग्लंड टौरंगा
१९ मार्च वि. ऑस्ट्रेलिया ऑकलंड
२२ मार्च वि. बांगलादेश हॅमिल्टन
२७ मार्च वि. दक्षिण आफ्रिका ख्राइस्टचर्च
Comments
Add Comment

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला