बालगुन्हेगारी रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 (जेजे कायदा , 2015) हा कायद्याशी संघर्ष करताना आढळलेल्या आणि काळजी तसेच संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी प्राथमिक कायदा आहे . महिला आणि बाल विकास मंत्रालय अनाथ आणि निराधार मुलांसह कठीण परिस्थितीतील मुलांच्या पुनर्वसनासाठी केंद्र पुरस्कृत बाल संरक्षण सेवा (सीपीएस ) योजना राबवत आहे.


बाल संरक्षण सेवा योजनेंतर्गत, सेवा प्रदान करण्यासाठी राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश सरकारांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते ,त्यात संस्थात्मक काळजी, गैर-संस्थात्मक काळजी, क्षमता बांधणीसाठी पाठबळ , मनुष्यबळ इत्यादींचा समावेश आहे.बालगृहे, निरीक्षण गृहे, विशेष गृहे, सुरक्षित जागा, खुली निवारागृहे आणि विशेष दत्तक संस्थेसह विविध प्रकारच्या बाल संगोपन संस्थांची (सीसीआय ) स्थापना आणि देखभाल करण्यासाठी अनुदान दिले जाते.बाल संगोपन संस्थावयानुसार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, करमणूक , आरोग्य सेवा, समुपदेशन इ. प्रदान करतात.योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांवर आहे.







लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी गृह मंत्रालय राज्य/केंद्रशासित प्रदेशांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देत आहे, या मार्गदर्शक सूचना www.mha.gov.in वर उपलब्ध आहेत.





सर्व कायदे, धोरणे, कार्यक्रम आणि प्रशासकीय यंत्रणा भारताच्या राज्यघटनेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क परिषदेमध्ये अंतर्भूत केलेल्या बालहक्कांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत हे सुनिश्चित करण्याचा अधिकार महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर )या स्वायत्त संस्थेला देण्यात आला आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वातीनें राज्य बालहक्क संरक्षण आयोग (एससीपीसीआर) सोबत सल्लामसलत, वेबिनार, बाल हक्क, त्यांचे आरोग्य, पोषण इत्यादींच्या संदर्भात सर्जनशील सामग्री विकसित करणे विविध उपक्रम हाती घेतले जातात.





केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Comments
Add Comment

बिहार निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर!

मोदी, शहा, राजनाथ यांच्यासह ४० नेत्यांची यादी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या

छत्तीसगडमध्ये १७० माओवादी आत्मसमर्पित!

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी

८१ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा: भारत सरकारकडून जागतिक अन्न दिनानिमित्त खास योजना

नवी दिल्ली : जागतिक अन्न दिनानिमित्त भारत सरकारने देशातील ८१ कोटी नागरिकांना अन्न आणि पोषण सुरक्षा देण्याचा

Gujarat Cabinet: गुजरातमध्ये 'राजकीय भूकंप'! मुख्यमंत्री वगळता सर्व १७ मंत्र्यांचे राजीनामे; अमित शहा आजच गांधीनगरमध्ये

पटेल मंत्रिमंडळात तीन वर्षांनंतर मोठे फेरबदल; उद्या शहा-नड्डांच्या उपस्थितीत नवीन मंत्र्यांचा

पंतप्रधान मोदींनी आंध्रतील मंदिरात केली पूजा

नांद्याल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नांद्याल जिल्ह्यातील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)