शहापूरमधील वीट व्यावसायिक कर्जाच्या ओझ्याखाली

शिवाजी पाटील


शहापूर : शहापूर तालुक्यात भातशेतीसोबत अनेक शेतकरी आता जोड व्यवसाय म्हणून वीट उत्पादन क्षेत्रात उतरले असून पावसाळा संपला की विटा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केल्याने वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडले असून वीटभट्टी व्यवसायिक कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत.



पावसाने पटावर टाकण्यात आलेल्या लाखोंच्या विटांचा पार चिखल झाल्याने विटव्यवसायासाठी घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज भरताना व्यवसायिकांच्या नाकीनऊ आले आहेत. विटांचे उत्पन्न मिळण्यावर कर्जफेडीचे गणित चुकल्याने ते कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत़
एकतर वाढत्या महामागाईने भातशेतीही तोट्यात जात आहे, असे असताना वीट व्यवसायातही लागणारा कच्चा माल, माती, कोळसा, भुसा, मजूर, यांच्या वाढलेल्या किमती आणि रॉयल्टीमुळे बेजार झालेले व्यावसायिक पावसाने पार हतबल झाले आहेत.



कोरोनामुळे एकीकडे मजुरांची कमतरता भासत आहे त्यामुळे त्यांचे दरही प्रचंड वाढले आहेत़ त्यातच सुगीची कामे संपल्याने महिनाभर केलेल्या वीट व्यवसायासाठीचे पट, मातीपासून तयार केलेल्या विटांवर पाणी फेरल्याने मोठया प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे
रब्बी शेतीचे ४५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान



अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी हंगामात पेरले गेलेली कडधान्य उडीद, मूग, वाल, हरभरा चवळी ही शेतकऱ्याला वर्षभर तारणहार ठरणारी कडधान्ये पावसातच कुजल्याने ती हातची गेल्यात जमा झाली आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ४५० हेक्टरवर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. बदलते हवामान, ढगाळ वातावरण, अचानक वाढणारी थंडी, तापमान यामुळे भाजीपालापिकांवरही अनेक प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरीही मोठया संकटात सापडले आहेत़

Comments
Add Comment

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :