राज्य सरकारने उचललं एसटी कर्मचा-यांच्या बडतर्फीचं पाऊल

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून आजपासून  बडतर्फीची कारवाई करण्यात सुरूवात झाली आहे. गेले अनेक दिवस कामावर हजर न राहिल्यानं  महामंडळाने हे पाऊल उचललं आहे. 


आजपासून कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.  सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता.  त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही त्यानंतर राज्य सरकारने आता कारवाईला सुरुवात केली आहे. 


राज्य सरकाच्या  विनंतीनंतर जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाही त्यांना कारणे दाखवा  नोटीस आजपासून बजावण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो .त्यानंतर तीन सुनावणी होतात. त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते.  या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो.  आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी 'हृदय शस्त्रक्रिया'; प्रकृती स्थिर, काही दिवस सक्तीची विश्रांती

मुंबई : महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मुंबईतील एशियन

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे