मुंबई (प्रतिनिधी) :पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक आहे. महावितरणकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्ससाठी अत्यंत माफक दरात वीज उपलब्ध आहे. पारंपरिक इंधनासह देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पर्यावरणस्नेही झाले पाहिजे, असे आवाहन महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी केले. यावेळी महावितरण, बीईईच्या ‘गो इलेक्ट्रिक’ रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला.
महावितरण व ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएनसी(बीईई) तर्फे आयोजित ‘गो इलेक्ट्रिक’ या इलेक्ट्रिक व्हेहीकल रोड शोचे उद्घाटन करताना खंडाईत बोलत होते. या प्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं) भारत जाडकर व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुभेच्छा संदेश पाठविल्यात.
कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, पर्यावरण संरक्षण करण्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग फार मोलाचा आहे. इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या लोकांना राज्य शासन व केंद्र शासनाने दिलेल्या अनेक सवलती दिलेल्या आहेत. राज्य शासनाचे ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१’ मध्ये चार्जिंग स्टेशनची उपलब्धता वाढविण्यात येणार असून या धोरणाद्वारे राज्य सरकारने महावितरण कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन पुरविण्यासाठी नोडल एजेन्सी म्हणून नियुक्त केले आहे.
या कार्यक्रमात पथनाट्यद्वारे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण व त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग याबद्दल एक सुंदर पथनाट्य सादर केले. त्यानंतर, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी रोड शोला हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ केला.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…