विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांपैकी चार जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर मात केली आहे. नागपूरमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेतर अकोला-वाशिम-बुलडाणामधून वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला. सहा जागांपैकी चार जागांची निवड बिनविरोध झाली होती. त्यातील दोन जागा भाजपाने जिंकल्या होत्या. ज्या दोन जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले त्या दोन्ही जागा भाजपानेच जिंकल्या.



नागपूरमध्ये काँग्रेसने भाजपाचे नगरसेवक रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. परंतु भाजपाचे नेते आणि तेथील उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे भोयर यांच्यावर सहज मात करतील हे लक्षात आल्यावर मतदानाला काही तासांचा अवधी असताना काँग्रेसने आपला पाठिंबा अपक्ष उणेदवार मंगेश देशमुख यांना जाहीर केला आणि भोयर यांना वाऱ्यावर सोडले. काँग्रेसच्या या धोरणामुळे महाविकास आघाडीतले त्यांचे मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्याबरोबर फरफटत गेले. त्यामुळे लढत बावनकुळे आणि देशमुख यांच्यात झाली आणि बावनकुळे यांनी अधिकची ६० मते मिळवत घसघशीत विजय मिळवला. याशिवाय भाजपाची ३१८ मतेही त्यांच्याकडेच राहिली. भोयर यांना अवघे एक मत मिळाले.



अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया रिंगणात होते. ते येथून तीन वेळा निवडून आले होते. परंतु या सरळ लढतीत भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी ४३८ मते मिळवत बाजोरिया यांना धूळ चारली. त्यांना ३२८ मते मिळाली.
याआधी कोल्हापूर, मुंबई आणि धुळे-नंदुरबार या मतदारसंघातून अनुक्रमे सतेज पाटील (काँग्रेस), राजहंस सिंह (भाजपा), सुनील शिंदे (शिवसेना) आणि अमरीश पटेल (भाजपा) बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकांच्या आधीच शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या होत्या. विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यावयाची ही जागा होती

Comments
Add Comment

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने