नागपूर : नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) येथील विधान परिषद निवडणुकीतल्या (MLC Election) विजयानंतर हे मोठे कम बॅक असल्याचे आणि हा निकाल भाजपच्या आगामी काळातील विजयाची नांदी असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेच्या ६ पैकी ४ जागेवर भाजपला विजय मिळाला असून, राज्यातील जनता भाजपसोबत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी यांचेही आभार मानले. तसेच आपण स्वत: निवडून आल्यावर जेवढा आनंद झाला नव्हता, त्याहीपेक्षा अधिक आनंद आता झाल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांचा या विजयाने महाविकासआघाडीला चपराख दिली असून, तीन पक्ष एकत्र आल्यावर काहीही होऊ शकतं.. हा गैरसमजही दुर केल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीची मतं ही नागपुरमध्ये आम्हाला मिळाली असून, मत देणाऱ्यांचं आम्ही आभार मानतो, असंही ते म्हणाले.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…