Categories: देश

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ प्रदर्शनाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Share

हैदराबाद : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी हैदराबाद शहरातील पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ (ईबीएसबी) या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक जनसंपर्क विभागाद्वारे आयोजित, या प्रदर्शनात हरियाणा आणि तेलंगणा या (एक भारत- श्रेष्ठ भारत) संलग्न राज्यांमधील कलाप्रकार, पाककृती, उत्सव, स्मारके, पर्यटन स्थळे इत्यादी विविध मनोवेधक पैलू मांडण्यात आले आहेत.

अशाप्रकारचे उपक्रम संलग्न राज्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांमधील परस्पर संपर्कांला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मदत करतील, असे नायडू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. दोन्ही राज्यातील लोकांना एकत्र आणणाऱ्या आणि आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची प्रशंसा केली.

एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम हा राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या देशातील लोकांमधील भावनिक बंध बळकट करण्यासाठी सरकारचा एक अनोखा उपक्रम आहे. या प्रदर्शनात प्रकाशन विभागातर्फे कला आणि संस्कृती या विषयांवरील उल्लेखनीय पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

28 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

29 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

36 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

40 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

49 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

52 minutes ago