दारिद्र्य रेषेखालील हजारो कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित

जव्हार ग्रामीण (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी ग्रामीण आणि दुर्गम भागात अंत्यत हलाखीचे जीवन जगत असलेल्या हजारो कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली असूनही अनेक शासकीय योजनांपासून ही कुटुंबे वंचित आहेत. १५ वर्षांपूर्वीच्या सर्वेक्षण यादीनुसार दारिद्र्य रेषेखालील यादीत नावे नसल्याने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ या कुटुंबांपासून आजही दूरच आहेत. तसेच, या यादीतील काही कुटुंबे आज सधन झाली असूनही ती शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.



शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण सन २००७ मध्ये करण्यात आले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेल्या वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यांमध्ये ६५ हजारांहून अधिक कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत होते. गेल्या १५ वर्षांत या ६५ हजार कुटुंबांमधील अनेक कुटुंबे सधन झाली आहेत. अनेकांकडे दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. तसेच, काही कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत. असे असतानाही या कुटुंब प्रमुखाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट असल्याने या कुटुंबाला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.



दुसरीकडे, गेल्या १५ वर्षांत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची विभागणी होऊन नव्याने कुटुंबे निर्माण झाली आहेत. यामधील अनेक कुटुंबे अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत. या कुटुंबातील सदस्याचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट नसल्याने या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात हलाखीचे जीवन जगणारे व दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नसलेल्या कुटुंबांची संख्या १५ हजाराहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.



जव्हार तालुक्यात वास्तव्य असलेल्या सुमारे एक लाख ४० हजार कुटुंब सदस्य हे दारिद्र्य रेषा व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहेत. या यादीत अनेक सधन कुटुंबांचा समावेश आहे. ही सधन कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय मदतीचा लाभ राजरोसपणे घेत असल्याचेही दिसून येत आहे.






अशी आहे आकडेवारी


जव्हार तालुक्यात ३१,३२८ शिधापत्रिकाधारक असून यामध्ये १ लाख ४० हजार कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. तालुक्यात १२०२ शुभ्र शिधापत्रिकाधारक असून यामध्ये ५,९०८ कुटुंबीय सदस्यांचा समावेश आहे. दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नसल्याने येथील अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या ३,७२८ कुटुंबीयांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झाल्याने त्यांना शासनाच्या मोफत योजनांचा लाभ मिळत नाही.
Comments
Add Comment

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

Mumbai BMC Election Results 2026 LIVE Counting : मतमोजणीच्या अडीच तासांनंतर 'हे' उमेदवार ठरले विजयी; पाहा विजयी उमेदवारांची पहिली यादी

वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप) वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप) वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप) वॉर्ड 36 – सिद्धार्थ

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के