अपघातातामुळे ४८ हजार लोकांनी गमावला जीव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० मध्ये एक्स्प्रेस वे सह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती संसदेत देण्यात आली. तर २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले.


यावेळी गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर इत्यादींचा समावेश होतो.


दरम्यान मंत्रालयाने सर्व टप्प्यांवर सुरक्षा ऑडिटद्वारे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रचना, बांधकाम आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


मार्च-एप्रिल २०२१ मध्ये ऑक्सिजन संकटाच्या वेळी, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर हाताळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र प्रशिक्षित ड्रायव्हर्सची कमतरता नोंदवली गेली होती.


“लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीची गरज, ऑक्सिजन व्यवस्थापनाचा विस्तारित कालावधी, क्रायोजेनिक टँकरच्या यादीत वाढ यामुळे जास्त थकवा/अपघात दर लक्षात घेऊन मंत्रालयाने धोकादायक मालवाहतुकीसाठी प्रशिक्षित चालक तयार करण्यासाठी राज्यांना सल्लागार जारी केला,” असे गडकरी म्हणाले. तर राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ ते २०१८ या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे एकूण ५,८०३ ब्लॅक स्पॉट्स ओळखले गेले आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


“दिल्ली, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या संबंधित राज्यांमधून वाहने, मोबाईल फोन आणि कागदपत्रे चोरीच्या तक्रारींसाठी नागरिक सेवा पोर्टलवर ऑनलाइन ई-एफआयआरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे,” असे नितीन गडकरी म्हणाले.


दरम्यान, चालू आर्थिक वर्षात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट अंतर्गत ७,३५० कोटी रुपयांच्या सवलतीच्या मूल्यासह आणि भांडवली खर्चासह ३८० किमी राष्ट्रीय महामार्ग कार्यान्वित केले असल्याची माहिती दिली होती. त्यातून ४९५ कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. याशिवाय टोल ऑपरेट ट्रान्सफर मोड अंतर्गत ४५० किमी लांबीच्या महामार्गासाठी निविदा जारी करण्यात आली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे