रोजगार इच्छुकांसाठी १२ ते १७ डिसेंबर पर्यंत ठाण्यात राज्यस्तरीय महारोजगार मेळावा

  105

ठाणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि. १२ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


हा मेळावा ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. इयत्ता नववी पास, दहावी व बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या युवक-युवतींनी यांनी सहभागी व्हावे, असे श्रीमती जावळे यांनी कळविले आहे.


संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील नोकरी साधक (Job Seeker) लॉगीन मधून आपापल्या वापरकर्ता आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील राज्यस्तरीय मेगा रोजगार मेळावा २०२१ या टॅबवर क्लिक करावे. यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्रीकरुन उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.


ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त कविता ह. जावळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.