देशमुख कुटुंबियांना हायकोर्टातून अंतरिम दिलासा

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने देशमुख कुटुंबीयांना 10 जानेवारी 2022 पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.

मुंबईच्या वरळी परिसरातील सदनिका आणि उरणमधील जमीन अशा मिळून सुमारे 4 कोटी 20 लाख रुपये मूल्याच्या मालमत्तांवर ईडीने हंगामी टांच आणली आहे. त्याविषयी न्यायिक प्राधिकरणाकडून अंतिम आदेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी घेणाऱ्या न्यायिक प्राधिकरणात अध्यक्ष आणि दोन सदस्य आवश्यक असतात. मात्र, सध्या केवळ एक सदस्य असून त्यांना विधी क्षेत्राचे ज्ञानही नाही, असा दावा देशमुख यांच्यातर्फे करण्यात आला. त्यामुळे हंगामी आदेश देत सुनावणी सुरू ठेवावी.

मात्र, 10 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम आदेश करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याला ईडीने अर्जाद्वारे आक्षेप घेतला. त्याविषयी न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आज, शुक्रवारी सुनावणी घेतल्यानंतर न्यायिक प्राधिकारणाच्या एकल सदस्यांना सुनावणी घेता येईल आणि अंतिम आदेशही करता येईल. मात्र, देशमुख यांच्याविरोधात कोणताही आदेश काढला तर तो उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती