देशमुख कुटुंबियांना हायकोर्टातून अंतरिम दिलासा

  38

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने देशमुख कुटुंबीयांना 10 जानेवारी 2022 पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.

मुंबईच्या वरळी परिसरातील सदनिका आणि उरणमधील जमीन अशा मिळून सुमारे 4 कोटी 20 लाख रुपये मूल्याच्या मालमत्तांवर ईडीने हंगामी टांच आणली आहे. त्याविषयी न्यायिक प्राधिकरणाकडून अंतिम आदेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी घेणाऱ्या न्यायिक प्राधिकरणात अध्यक्ष आणि दोन सदस्य आवश्यक असतात. मात्र, सध्या केवळ एक सदस्य असून त्यांना विधी क्षेत्राचे ज्ञानही नाही, असा दावा देशमुख यांच्यातर्फे करण्यात आला. त्यामुळे हंगामी आदेश देत सुनावणी सुरू ठेवावी.

मात्र, 10 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम आदेश करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याला ईडीने अर्जाद्वारे आक्षेप घेतला. त्याविषयी न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आज, शुक्रवारी सुनावणी घेतल्यानंतर न्यायिक प्राधिकारणाच्या एकल सदस्यांना सुनावणी घेता येईल आणि अंतिम आदेशही करता येईल. मात्र, देशमुख यांच्याविरोधात कोणताही आदेश काढला तर तो उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई