माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा गौप्यस्फोट

मुंबई :भारताचा संघ प्रशिक्षक बनू नये, अशी बीसीसीआयमधील काही लोकांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.

बीसीसीआयमध्ये काही लोक उपस्थित होते, ज्यांना मला हेड कोच बनवायचे नव्हते. २०१४मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेडकसोटीदरम्यान महेंद्रसिंग धोनीच्या जागी विराट कर्णधार झाला. बदल होण्याआधीच मला अचानक बाहेर काढण्यात आले. या निर्णयामुळे मला दु:ख झाले आहे, कारण मला ज्या पद्धतीने हटवण्यात आले ते योग्य नव्हते. जवळपास ९ महिने उलटले आणि हीच मंडळी माझ्याकडे पुन्हा आली. संघात समस्या असल्याचे मला सांगण्यात आले. समस्या काय आहे, हे मला समजत नव्हते, असे शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले.

भरत अरुण यांना मी गोलंदाजी प्रशिक्षक करू नये अशीही या लोकांची इच्छा होती. मी मागे वळून पाहतो तेव्हा ही परिस्थिती कशी बदलली हे मला जाणवते. त्यांना जी व्यक्ती गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नको होती, त्याने दमदार कामगिरी केली. आता त्यांच्या कामावर कुणालाही बोट दाखवता येत नाही. पण, काही खास व्यक्ती होत्या. त्यांनी मी हेड कोच बनू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले, असेही शास्त्री पुढे म्हणाले.

२०१७मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती झाली.
शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने ४३ कसोटी सामने खेळताना २५ जिंकले आणि १३ गमावले. ५ सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने ७९ सामने खेळले ज्यात ५३ जिंकले. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने ६८ सामने खेळताना ४४ सामन्यांत विजय मिळवला.
Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक