भारतात लोकशाही मजबूत

 



 





नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करण्याचा मला अभिमान वाटतो. आजवरच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आमच्याकडे लोकशाही मजबूत आहे. भविष्यातही इथे लोकशाहीला कसलाच धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘समीट फॉर डेमॉक्रॉसी’या आभासी परिषदेमध्ये बोलताना दिला.






अमेरिकेचे पंतप्रधान ज्यो बायडेन यांनी आयोजित केलेल्या ‘समीट फॉर डेमॉक्रॉसी’या आभासी परिषदेमध्ये संवाद साधताना लोकशाहीचे महत्त्व विषद केले. एकता, समता, बंधुत्व आणि सर्वधर्मसमभावाचा विचार देशाला आणि समाजाला तारतो. आम्ही याच सूत्रींच्या आधारे लोकशाही चांगल्या प्रकारे राबवली आहे. तसेच लोकशाहीचा आदर करणारा सर्वात मोठा देश आहोत, सर्व जगाला दाखवून दिले आहे. आताही आमची लोकशाही सक्षम आहे. भविष्यात तिला कुठलाही धोका नाही. लोकशाही टिकून राहण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रितपणे ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले.






‘समीट फॉर डेमॉक्रॉसी’या आभासी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी मोदी यांनी सोशल मीडियासह क्रीप्टोकरन्सीबाबत भारताची भूमिकाही स्पष्ट केली. सोशल मीडियासह क्रीप्टोकरन्सीचा वापर लोकशाही मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, त्यासाठी जागतिक समुदायाने ठोस नियम बनवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.






जगभरात क्रीप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत आहे. परिणामी, भारतातही दिवसेंदिवस गुंतवणुकदारांची संख्या लाखोपर्यंत पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयचे २०१८ चे परिपत्रक रद्द केले होते. यामध्ये आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांना क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करण्यास किंवा त्यासाठी वित्तपुरवठा करण्यास बंदी घातली होती.


Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने