भारतात लोकशाही मजबूत

Share

 

 

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करण्याचा मला अभिमान वाटतो. आजवरच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आमच्याकडे लोकशाही मजबूत आहे. भविष्यातही इथे लोकशाहीला कसलाच धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘समीट फॉर डेमॉक्रॉसी’या आभासी परिषदेमध्ये बोलताना दिला.


अमेरिकेचे पंतप्रधान ज्यो बायडेन यांनी आयोजित केलेल्या ‘समीट फॉर डेमॉक्रॉसी’या आभासी परिषदेमध्ये संवाद साधताना लोकशाहीचे महत्त्व विषद केले. एकता, समता, बंधुत्व आणि सर्वधर्मसमभावाचा विचार देशाला आणि समाजाला तारतो. आम्ही याच सूत्रींच्या आधारे लोकशाही चांगल्या प्रकारे राबवली आहे. तसेच लोकशाहीचा आदर करणारा सर्वात मोठा देश आहोत, सर्व जगाला दाखवून दिले आहे. आताही आमची लोकशाही सक्षम आहे. भविष्यात तिला कुठलाही धोका नाही. लोकशाही टिकून राहण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रितपणे ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले.


‘समीट फॉर डेमॉक्रॉसी’या आभासी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी मोदी यांनी सोशल मीडियासह क्रीप्टोकरन्सीबाबत भारताची भूमिकाही स्पष्ट केली. सोशल मीडियासह क्रीप्टोकरन्सीचा वापर लोकशाही मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, त्यासाठी जागतिक समुदायाने ठोस नियम बनवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


जगभरात क्रीप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत आहे. परिणामी, भारतातही दिवसेंदिवस गुंतवणुकदारांची संख्या लाखोपर्यंत पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयचे २०१८ चे परिपत्रक रद्द केले होते. यामध्ये आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांना क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करण्यास किंवा त्यासाठी वित्तपुरवठा करण्यास बंदी घातली होती.

Recent Posts

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

10 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

41 minutes ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

1 hour ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

1 hour ago

Emraan Hashmi: इमरान हाश्मीच्या नव्या चित्रपटावर भाजपा आणि काँग्रेस खासदारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…

2 hours ago

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…

2 hours ago