केळी बागा उद्ध्वस्त करण्याचा डाव सुरूच

कीर्ती केसरकर


नालासोपारा : गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपारा पश्चिमेला असलेल्या गावांमध्ये केळीच्या बागांचे नुकसान करून शेतकऱ्यांना हैराण केले जात आहेत. असे अनेक शेती माफीया आहेत, जे मनमानी कारभार करत रात्रीच्या वेळेस केळीच्या बागा उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत.


नालासोपारा पश्चिम आणि विरार पश्चिमेला मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहेत. यामध्ये शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत करून शेती करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत; परंतु या गावांमध्ये अजूनही जमिनींचे सातबारा एकच असल्याने कोणीही येऊन या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.


जमिनीची वाटणी अद्यापही व्यवस्थितरीत्या झालेली नाही. जमिनीचे सातबारे यांवर गावातील सर्वांची नावे असल्याने ज्यांना शेतीवर कब्जा मिळवायचा असेल, त्यांच्याकडून या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे नुकसान करण्यात येत आहे. सध्या जमिनीचे दर हे वाढलेले आहेत. याचबरोबर या परिसरामध्ये पर्यटकांची ये-जासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने जे नागरिक शेती करत नाहीत त्यांच्याकडून या ठिकाणी येऊन नुकसान केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.



सातबाऱ्याचा प्रश्न लवकर सोडवावा


गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा ऐरणीवर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी असेच केळीच्या बागांचे नुकसान करून त्या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता. पुन्हा अशीच घटना मंगळवार रात्री घडली आहे. यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देत लवकरात लवकर सातबाऱ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू