केळी बागा उद्ध्वस्त करण्याचा डाव सुरूच

कीर्ती केसरकर


नालासोपारा : गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपारा पश्चिमेला असलेल्या गावांमध्ये केळीच्या बागांचे नुकसान करून शेतकऱ्यांना हैराण केले जात आहेत. असे अनेक शेती माफीया आहेत, जे मनमानी कारभार करत रात्रीच्या वेळेस केळीच्या बागा उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत.


नालासोपारा पश्चिम आणि विरार पश्चिमेला मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहेत. यामध्ये शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत करून शेती करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत; परंतु या गावांमध्ये अजूनही जमिनींचे सातबारा एकच असल्याने कोणीही येऊन या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.


जमिनीची वाटणी अद्यापही व्यवस्थितरीत्या झालेली नाही. जमिनीचे सातबारे यांवर गावातील सर्वांची नावे असल्याने ज्यांना शेतीवर कब्जा मिळवायचा असेल, त्यांच्याकडून या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे नुकसान करण्यात येत आहे. सध्या जमिनीचे दर हे वाढलेले आहेत. याचबरोबर या परिसरामध्ये पर्यटकांची ये-जासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने जे नागरिक शेती करत नाहीत त्यांच्याकडून या ठिकाणी येऊन नुकसान केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.



सातबाऱ्याचा प्रश्न लवकर सोडवावा


गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा ऐरणीवर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी असेच केळीच्या बागांचे नुकसान करून त्या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता. पुन्हा अशीच घटना मंगळवार रात्री घडली आहे. यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देत लवकरात लवकर सातबाऱ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा