वाचा, महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने कशी केली कोरोनावर मात

डोंबिवली : "कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून उपचार घ्यावेत आणि आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे म्हणजे तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडाल, असे वक्तव्य महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज मिळालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने व्यक्त केले.


दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क कंट्रीतून २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे आलेला हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य खात्याने त्यास तातडीने महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करून त्याची जीनोम सिक्वेन्स सिंग चाचणी केली असता सदर रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले होते. तो महाराष्ट्रातला पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण ठरल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झाले होते. सदर रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला.


त्यावेळी सदर रुग्णाने उत्तम सेवा दिल्याबद्दल महापालिकेचे व आरोग्य विभागाचे खूप खूप आभार मानले. मला २४ तास डॉक्टर उपलब्ध होते, दर दोन तासांनी माझी सर्व प्रकारची तपासणी करून काळजी घेण्यात येत होती, असे त्याने डिस्चार्ज मिळताना सांगितले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाल्यामुळे महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील विलगीकरण केंद्रात या रुग्णाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Comments
Add Comment

ट्विटर बंद पडलं

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील