वाचा, महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने कशी केली कोरोनावर मात

डोंबिवली : "कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून उपचार घ्यावेत आणि आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे म्हणजे तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडाल, असे वक्तव्य महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज मिळालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने व्यक्त केले.


दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क कंट्रीतून २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे आलेला हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य खात्याने त्यास तातडीने महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करून त्याची जीनोम सिक्वेन्स सिंग चाचणी केली असता सदर रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले होते. तो महाराष्ट्रातला पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण ठरल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झाले होते. सदर रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला.


त्यावेळी सदर रुग्णाने उत्तम सेवा दिल्याबद्दल महापालिकेचे व आरोग्य विभागाचे खूप खूप आभार मानले. मला २४ तास डॉक्टर उपलब्ध होते, दर दोन तासांनी माझी सर्व प्रकारची तपासणी करून काळजी घेण्यात येत होती, असे त्याने डिस्चार्ज मिळताना सांगितले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाल्यामुळे महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील विलगीकरण केंद्रात या रुग्णाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Comments
Add Comment

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी