वाचा, महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने कशी केली कोरोनावर मात

डोंबिवली : "कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून उपचार घ्यावेत आणि आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे म्हणजे तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडाल, असे वक्तव्य महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज मिळालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने व्यक्त केले.


दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क कंट्रीतून २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे आलेला हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य खात्याने त्यास तातडीने महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करून त्याची जीनोम सिक्वेन्स सिंग चाचणी केली असता सदर रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले होते. तो महाराष्ट्रातला पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण ठरल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झाले होते. सदर रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला.


त्यावेळी सदर रुग्णाने उत्तम सेवा दिल्याबद्दल महापालिकेचे व आरोग्य विभागाचे खूप खूप आभार मानले. मला २४ तास डॉक्टर उपलब्ध होते, दर दोन तासांनी माझी सर्व प्रकारची तपासणी करून काळजी घेण्यात येत होती, असे त्याने डिस्चार्ज मिळताना सांगितले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाल्यामुळे महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील विलगीकरण केंद्रात या रुग्णाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक