वाचा, महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने कशी केली कोरोनावर मात

डोंबिवली : "कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून उपचार घ्यावेत आणि आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे म्हणजे तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडाल, असे वक्तव्य महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज मिळालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने व्यक्त केले.


दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क कंट्रीतून २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे आलेला हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य खात्याने त्यास तातडीने महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करून त्याची जीनोम सिक्वेन्स सिंग चाचणी केली असता सदर रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले होते. तो महाराष्ट्रातला पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण ठरल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झाले होते. सदर रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला.


त्यावेळी सदर रुग्णाने उत्तम सेवा दिल्याबद्दल महापालिकेचे व आरोग्य विभागाचे खूप खूप आभार मानले. मला २४ तास डॉक्टर उपलब्ध होते, दर दोन तासांनी माझी सर्व प्रकारची तपासणी करून काळजी घेण्यात येत होती, असे त्याने डिस्चार्ज मिळताना सांगितले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाल्यामुळे महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील विलगीकरण केंद्रात या रुग्णाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात