परीक्षेसाठी गेलेली बोईसरची तरुणी मुंबईतून बेपत्ता

बोईसर : मुंबईतील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी बोईसर येथील विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी २९ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली आहे. सदिच्छा साने असे या तरुणीचे नाव असून प्रीलियम परीक्षा देण्यासाठी ती मुंबईला गेली होती. सदिच्छाचे अपहरण झाले असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.



वैद्यकीय शिक्षण घेणारी सदिच्छा मनीष साने ही तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली होती. मात्र, ती २९ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदिच्छा साने ही २२ वर्षीय तरुणी बोईसरमधील खोदारामबाग येथे राहत होती. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी सदिच्छा प्रीलियमची परीक्षा देण्यासाठी ती मुंबईला गेली होती. मात्र, ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


शेवटचे लोकेशन वांद्रे ब्रँडस्टॅण्ड



दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रीलियमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद आला असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सदिच्छाच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन वांद्रे ब्रँडस्टॅण्ड येथे दाखवण्यात येत आहे. त्या ठिकाणी तिला पाहणारा शेवटचा एक जीवरक्षक असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,