नेरळ : नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी सेवा सुरू करावी आणि नेरळ येथून माथेरानसाठी मालवाहू सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी माथेरान भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शिष्टमंडळाने आज रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली. तसेच भाजप आमदारांकडून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, वैष्णव यांनी या तिन्ही मागण्यांवर रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
२०१९ मधील मुसळधार पावसानंतर नेरळ-माथेरान रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला फटका बसला असल्याने त्याकडे रेल्वे मंत्र्यांनी लक्ष द्यावे, याबाबत माथेरानच्या नगरसेवकांचे शिष्टमंडळ बुधवारी नवी दिल्लीत पोहचले होते. भाजप राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहरअध्यक्ष आकाश चौधरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
यावेळी माथेरानच्या भाजप पदाधिकारी यांनी मिनीट्रेनचे माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी किती महत्त्व आहे, हे रेल्वेमंत्री यांना पटवून दिले. त्याचवेळी मिनीट्रेन आणि माथेरानचे पर्यटन हे समीकरण असल्याने भाजपच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे नेरळ-माथेरान-नेरळ ही प्रवासी सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मार्गाची लवकरात लवकर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
भविष्यात नेरळ-माथेरान दरम्यान मालवाहतुकीची ट्रेन सुरू करणे, अमन लॉज ते माथेरान दरम्यान सध्या धावणाऱ्या तीन डब्यांच्या ट्रेनऐवजी आठ डब्यांची ट्रेन सुरू करण्याबाबत पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेशही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भाजपचे रायगड जिल्ह्यातील युवानेते किरण ठाकरे, माथेरानचे नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम तसेच भाजप पदाधिकारी संजय भोसले उपस्थित होते.
कर्जत-पनवेल मार्गावर शटलसेवा?
कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान शटल रेल्वे सुरू करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शटल सेवेसाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अडीच वर्षांपासून बंद असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सुरक्षाविषयक पाहणीही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावरून सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र, शटल वा लोकल सेवा नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व चाकरमान्यांना प्रवासात अडचणी येत होत्या. त्याचबरोबर या भागाच्या विकासालाही मर्यादा आल्या आहेत. या प्रश्नावर आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत पाटील आणि आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू केले आहेत.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…