आगीत बीएमडब्ल्यूच्या ४५ गाड्या जळून खाक

नवी मुंबई, : तुर्भे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर डी-२०७ मध्ये बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. त्यात जीवितहानी झाली नसली तरी ४० ते ४५ महागड्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील चार मजली कारच्या शोरूममध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. यात शोरुम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि सीबीडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

या आगीत बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रे देखील जळून खाक झालीत. तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर