नवी मुंबई, : तुर्भे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर डी-२०७ मध्ये बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. त्यात जीवितहानी झाली नसली तरी ४० ते ४५ महागड्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील चार मजली कारच्या शोरूममध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. यात शोरुम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि सीबीडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
या आगीत बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रे देखील जळून खाक झालीत. तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…