८४० कोटींचे प्रस्ताव चर्चेविना

मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत ८४० कोटी रुपयांचे प्रस्ताव आले असताना कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करू दिली नसल्याचे आरोप भाजप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. यामुळे भाजप सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेत शेवटपर्यंत तीव्र विरोध केला.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर ८४० कोटी रुपयांचे विविध विषय आले होते; मात्र सत्ताधाऱ्यांनी भाजप स्थायी समिती सदस्यांना कोणत्याच विषयावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला असून यावेळी दहिसर जम्बो कोविड सेंटरचाही प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. त्याला देखील भाजपने विरोध केला होता. एका कोविड सेंटरसाठी ११ कोटींचे भाडे कशासाठी? एवढ्या खर्चात पालिकेने स्वतःचे कोविड सेंटर उभारले असते, असे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.



तब्बल ८४० कोटींचे प्रस्ताव आले असताना यावर चर्चा होऊ न देणे हे लोकशाही प्रक्रियेसाठी घातक असून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होईल म्हणून भाजपच्या सदस्यांना चर्चेपासून प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही शिरसाट म्हणाले. बहुतांश विषय स्थायी समितीत विचारात घ्यायचे नाहीत आणि शेवटच्या दिवशी घाईघाईत मंजूर करायचे, असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.


Comments
Add Comment

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील