८४० कोटींचे प्रस्ताव चर्चेविना

मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत ८४० कोटी रुपयांचे प्रस्ताव आले असताना कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करू दिली नसल्याचे आरोप भाजप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. यामुळे भाजप सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेत शेवटपर्यंत तीव्र विरोध केला.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर ८४० कोटी रुपयांचे विविध विषय आले होते; मात्र सत्ताधाऱ्यांनी भाजप स्थायी समिती सदस्यांना कोणत्याच विषयावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला असून यावेळी दहिसर जम्बो कोविड सेंटरचाही प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. त्याला देखील भाजपने विरोध केला होता. एका कोविड सेंटरसाठी ११ कोटींचे भाडे कशासाठी? एवढ्या खर्चात पालिकेने स्वतःचे कोविड सेंटर उभारले असते, असे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.



तब्बल ८४० कोटींचे प्रस्ताव आले असताना यावर चर्चा होऊ न देणे हे लोकशाही प्रक्रियेसाठी घातक असून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होईल म्हणून भाजपच्या सदस्यांना चर्चेपासून प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही शिरसाट म्हणाले. बहुतांश विषय स्थायी समितीत विचारात घ्यायचे नाहीत आणि शेवटच्या दिवशी घाईघाईत मंजूर करायचे, असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.


Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.