...अन् शाळा प्रशासनाने तत्काळ केले पैसे परत

पारस सहाणे


जव्हार : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे उत्तम शिक्षण नामांकित शाळांमध्ये दिले जाते. त्यासाठी पुणे, ठाणे, नगर, सातारा आणि पालघर जिल्ह्यांतील नामांकित इंग्रजी शाळांमध्ये निवासी इंग्रजी शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्यासह संपूर्ण शिक्षणाचा खर्च सरकार करते. असे असतानाही पाचगणी येथील विस्डेन इंग्रजी शाळेने विक्रमगडमधून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी आदिवासी पालकांकडून प्रत्येकी ८०० रुपये घेतले. या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी शाळा प्रशासनाला चांगलेच सुनावले आणि सरकारी नियम सांगितला. त्यामुळे शाळा प्रशासनाने सर्व पालकांना घेतलेले पैसे तत्काळ परत केले.


आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी सरकारने नामांकित शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण ही योजना सुरू केली. या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासह, निवासी शिक्षणाचा खर्च आदिवासी विकास विभाग करतो. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, तलासरी, आणि डहाणू या तालुक्यांतील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. या विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून पुणे, सातारा, नगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील नामांकित शाळांची निवड केली.


आता शाळा सुरू झाल्याने विक्रमगड तालुक्यातील ४७ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी, पाचगणीतील विस्डेन इंग्रजी शाळेची खासगी बस आली होती. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी प्रति विद्यार्थी ८०० रुपये भाडे, त्यांच्या पालकांकडून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा परिषदेतील सदस्य प्रकाश व सदस्य सारिका निकम, सागर आळशी तेथे पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रोखली. तसेच, त्यांना सुनावत सरकारी नियमांची आठवण करून दिली. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची पाचावर धारण झाली. त्यांनी पालकांकडून घेतलेले पैसे जागेवरच परत देण्यास भाग पाडले. निकम यांच्या दणक्याने आदिवासी विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने

रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेतून २.३० किलो सोने लंपास

अमरावती : रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले

साताऱ्यात खळबळ: यशवंत बँकेत ११२ कोटींचा महाघोटाळा; माजी अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

बनावट कर्ज, कागदपत्रांमध्ये फेरफार; ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या निधीचा उद्देशबाह्य वापर करून केलेला आर्थिक

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा