...अन् शाळा प्रशासनाने तत्काळ केले पैसे परत

पारस सहाणे


जव्हार : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे उत्तम शिक्षण नामांकित शाळांमध्ये दिले जाते. त्यासाठी पुणे, ठाणे, नगर, सातारा आणि पालघर जिल्ह्यांतील नामांकित इंग्रजी शाळांमध्ये निवासी इंग्रजी शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्यासह संपूर्ण शिक्षणाचा खर्च सरकार करते. असे असतानाही पाचगणी येथील विस्डेन इंग्रजी शाळेने विक्रमगडमधून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी आदिवासी पालकांकडून प्रत्येकी ८०० रुपये घेतले. या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी शाळा प्रशासनाला चांगलेच सुनावले आणि सरकारी नियम सांगितला. त्यामुळे शाळा प्रशासनाने सर्व पालकांना घेतलेले पैसे तत्काळ परत केले.


आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी सरकारने नामांकित शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण ही योजना सुरू केली. या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासह, निवासी शिक्षणाचा खर्च आदिवासी विकास विभाग करतो. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, तलासरी, आणि डहाणू या तालुक्यांतील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. या विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून पुणे, सातारा, नगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील नामांकित शाळांची निवड केली.


आता शाळा सुरू झाल्याने विक्रमगड तालुक्यातील ४७ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी, पाचगणीतील विस्डेन इंग्रजी शाळेची खासगी बस आली होती. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी प्रति विद्यार्थी ८०० रुपये भाडे, त्यांच्या पालकांकडून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा परिषदेतील सदस्य प्रकाश व सदस्य सारिका निकम, सागर आळशी तेथे पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रोखली. तसेच, त्यांना सुनावत सरकारी नियमांची आठवण करून दिली. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची पाचावर धारण झाली. त्यांनी पालकांकडून घेतलेले पैसे जागेवरच परत देण्यास भाग पाडले. निकम यांच्या दणक्याने आदिवासी विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी