धुळे शहरातील कबीरगंज परिसरातील जनता सोसायटीत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अग्निकांड प्रकरणात अखेर तिघांच्या विरुध्द आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करणा-या नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख याचा प्रमुख समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात रुक्साना बानो शेख सलीम रा.जनता सोसायटी या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मागील भांडणाच्या वादातून दाखल केलेली पोलिसातील तक्रार मागे घेतली नाही म्हणून नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख सोबत हमीद नाट्या आणि वसीम रंधा या तिघांनी फिर्यादी रुक्साना बानो शेख हिची वहीनी नसीम बानो हिच्या घराचा दरवाजा उघडून घरात घुसून एका प्लॅस्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून माचीसने आग लावून दिली. त्यामुळे जनता सोसायटीतील ९ रहिवाशांची घरे जळून खाक झाली.
यात हसीना बी असलम खाटीक यांच्या घरात ८ लाख, कान्नु अन्सारी अब्दुला अन्सारी यांच्या घरातील २ लाख, निसार शेख यासीन याच्या घरातील १० लाखाचे, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांच्या घरात १० लाखाचे, मोइदोद्दीन गुलाम रसुल खाटीक याच्या घरातील ८ लाखाचे, शाकीराबी आरीफ शहा यांच्या घरातील ७ लाखाचे, रुक्सानाबी यासीन शहा यांच्या घरातील १० लाखाचे, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांच्या घरातील ५ लाखाचे आणि नियाज सैय्यद असलम यांच्या घरातील १० लाखाचे असे एकुण ७० लाखाचे नुकसान झाले.
याप्रकरणी नदीम काल्या, हमीद नाट्या व वसीम रंधा या तिघांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…