९ घरे पेटवली, ३ संशयितांना पोलिसांकडून अटक

धुळे शहरातील कबीरगंज परिसरातील जनता सोसायटीत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अग्निकांड प्रकरणात अखेर तिघांच्या विरुध्द आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करणा-या नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख याचा प्रमुख समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात रुक्साना बानो शेख सलीम रा.जनता सोसायटी या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मागील भांडणाच्या वादातून दाखल केलेली पोलिसातील तक्रार मागे घेतली नाही म्हणून नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख सोबत हमीद नाट्या आणि वसीम रंधा या तिघांनी फिर्यादी रुक्साना बानो शेख हिची वहीनी नसीम बानो हिच्या घराचा दरवाजा उघडून घरात घुसून एका प्लॅस्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून माचीसने आग लावून दिली. त्यामुळे जनता सोसायटीतील ९ रहिवाशांची घरे जळून खाक झाली.

यात हसीना बी असलम खाटीक यांच्या घरात ८ लाख, कान्नु अन्सारी अब्दुला अन्सारी यांच्या घरातील २ लाख, निसार शेख यासीन याच्या घरातील १० लाखाचे, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांच्या घरात १० लाखाचे, मोइदोद्दीन गुलाम रसुल खाटीक याच्या घरातील ८ लाखाचे, शाकीराबी आरीफ शहा यांच्या घरातील ७ लाखाचे, रुक्सानाबी यासीन शहा यांच्या घरातील १० लाखाचे, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांच्या घरातील ५ लाखाचे आणि नियाज सैय्यद असलम यांच्या घरातील १० लाखाचे असे एकुण ७० लाखाचे नुकसान झाले.

याप्रकरणी नदीम काल्या, हमीद नाट्या व वसीम रंधा या तिघांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला