रत्नागिरी : पावसाला पोषक हवामान झाल्याने कमाल तापमानात घट झाली तर किमान तापमानात वाढ झाल्याने रत्नागिरीत काही भागात गारठा वाढू लागला आहे. ५ ते ९ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचा जोर ओसरू लागला असल्याने कोकणात थंडी परतण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
आगामी आठवड्याच्या कालावधीत कोकण किनारी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर रायगड जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस झाला. चालू आठवड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी आगामी आठवड्यात अवकाळीचे सातत्य राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची अटकळ आहे. ९ डिसेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…