नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंसाला सोमवारी २९ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मथुरेत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
अखिल भारत हिंदू महासभेने शाही इदगाह मशिदीच्या आत असलेल्या जन्मस्थानी भगवान कृष्णाची मूर्ती स्थापित करण्याची परवानगी मागितल्यानंतर मथुरेमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले.
“आम्ही जवळपास ३,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. शहरात आज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची आम्हाला खात्री देण्यात आली आहे. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असून परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू,” असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी सांगितले.
मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जास्तीत जास्त सुरक्षा पुरविण्यात आली. आज स्थानिक लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तणावपूर्ण परिस्थितीमुळे पोलिसांनी प्रवासी सूचना जारी केल्या असून सात मार्गांवर प्रवास करण्यास मनाई केली आहे. दींग गेट आणि मंदिर परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहेत.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…