कविता हा माझ्या जगण्याचा भाग

Share

नाशिक (प्रतिनिधी): कवी असल्याने नट म्हणून काम करत असताना संवेदनशील कवितांचा परिणाम हा अभिनयावर देखील होतो. त्यामुळे कवी आणि नट म्हणून भूमिका बजावत असताना कविता हा माझ्या जगण्याचा भाग बनलाय असे प्रतिपादन अभिनेते कवी किशोर कदम यांनी व्यक्त केले. नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ‘संवाद लक्ष्यवेधी कवींशी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.


या कार्यक्रमात संवादक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. गोविंद काजरेकर, कवी प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचिता खल्लाळ, खलील मोमीन, वैभव जोशी यांनी आपल्या कवितांविषयी व आपला जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, समन्वयक विश्वास ठाकूर उपस्थित होते.


यावेळी बोलताना कवी किशोर कदम म्हणाले की, संवेदनशील भूमिका मांडण्यासाठी कविता अधिक उपयोगी ठरते. कविता लिहिणारा कवी यात स्त्री पुरुष भेद नको. जगण्याची भीती प्रत्येक कालावधीत होती. त्यामुळे मला देखील भीती वाटते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आजूबाजूला जे घडत आहे ते कवितेत मांडले गेले पाहिजे असे मत सुचिता खल्ल्याळ यांनी व्यक्त केले. कवीतेत काव्य अतिशय महत्त्वाचे असते. मी कविता एन्जॉय करतो असे मत खलील मोमीन यांनी व्यक्त केले.
तर बाल कविता लिहिणे मला खूप अवघड वाटते कारण चौकटीच्या बाहेर जाऊन लिहिणे आवश्यक असते असे मत व्यक्त करत काही निवडक कवितांचे सादरीकरण केले

Recent Posts

सोने आकाशात, डाळी जमिनीवर…

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…

2 minutes ago

शेअर मार्केटमधील शेअर खरेदी-विक्री अर्थात ट्रेडिंगचे प्रकार

डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…

6 minutes ago

जल पर्यटनाची नवी दिशा…

- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…

14 minutes ago

आमची बेस्ट सक्षम व्हावी…

- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…

17 minutes ago

ग्रामीण भागातील गरिबी घटली, मोदींचे कौतुकास्पद कार्य

जागतिक बँकेच्या एका ताज्या अहवालानुसार, भारताने २०११ पासून ते २०२२-२३ या कालावधीत १७.१ कोटी लोकांना…

19 minutes ago

DC vs RCB, IPL 2025: आरसीबीचा दिल्लीवर ६ विकेट राखून विजय, कोहली-कुणालची कमाल

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने…

58 minutes ago