‘जवद’ वादळाचा धसका; नौका बंदराच्या आश्रयाला

Share

रत्नागिरी (वार्ताहर) :अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला सलग दोन दिवस झोडपून काढले; मात्र शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असून काहीकाळ ढगाळ वातावरण होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘जवद’ वादळामुळे समुद्र खवळल्याने मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. तर केरळ, तामिळनाडूतील शंभरहून अधिक मच्छीमारी नौकांनी भगवतीसह जयगड बंदराचा आसरा घेतला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात ३९.३३ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटामुळे बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वीज पुरवठा दोन तास खंडित करण्यात आला होता. त्यामुळे फिरण्यासाठी रत्नागिरीतील किनारी भागात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेकांनी माघारी जाणे पसंत केल्याने पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले. दिवसभर जिल्ह्यात सगळीकडेच पावसाळी वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

पूर्व किनारीपट्टीवर जवद चक्रीवादळ निर्माण झाले असून खोल समुद्रातील वातावरण बिघडले आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीही पूर्णतः ठप्प आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या ३ हजार ७७ नौका आहेत. त्यात ३ हजार ५१९ यांत्रिकी तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत. दिवसभरात मोठी उलाढाल ठप्प झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. तसेच वादळामुळे केरळ, तामिळनाडूतील शंभरहून अधिक मच्छीमारी नौका आश्रयासाठी भगवती, मिऱ्या बंदरात आल्या होत्या

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

15 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

16 hours ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

16 hours ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

17 hours ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

17 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

17 hours ago