परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

मुंबई : राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेत सिंह यांना धक्का दिला. मात्र आज दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंह यांनी राज्य सरकारचा निलंबनाचा हा आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे.


ज्येष्ठतेनुसार पोलिस महासंचालकांकडून आलेला हा आदेश आपण स्वीकारणार नाही, असं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. याचे कारण देताना त्यांनी स्षष्ट केले आहे की आपण स्वत: पोलिस महासंचालक श्रेणीतील अधिकारी आहोत. हे लक्षात घेता पोलिस महासंचालक आपल्याला निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही, असे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हा आदेश आपल्याला देऊ शकतात,असे परमबीर सिंह यांचं म्हणणं आहे.


राज्याच्या गृह विभागाचे अतिरिकक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे आहेत. सध्या ते प्रकृती अस्वास्थ्यामुळं रजेवर आहेत. त्यामुळे ते सध्या तरी परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा आदेश देऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत आता राज्य सरकार कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


परमबीर यांच्या निलंबनाच्याबाबतच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या निलंबनावर काल शिक्कामोर्तब झाले. देबाशीष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच ते सेवेतही रुजू न झाल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे. तसेच माजी मुंबई पोलिस अधिकारी असेलल्या परमबीर सिंह यांच्यावर खडणीचे आणि अॅट्रोसिटीचे गुन्हेही दाखल आहेत.


दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात ते फरार असल्याचा १७ नोव्हेंबरचा आदेश देण्यात आला होता. तो आदेश कालच अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने मागे घेतला आहे. गोरेगावचे व्यावसायिक बिमल अगरवाल यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परमबीर यांच्यावर दाखल आहे. तसेच परमबीर हे मुंबई पोलिस गुन्हे शाखेने वारंवार चौकशीसाठी बोलावूनही हजर झाले नाहीत. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना फरार घोषित करण्याची मागणी केली. त्यावर न्या. सुधीर भाजीपाले यांनी आधी अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आणि त्यानंतर त्यांना फरार घोषित केले होते.

Comments
Add Comment

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच