मुंबई : कसोटीसाठी पहिल्या कसोटीतील कर्णधार अजिंक्य रहाणेसह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला वगळण्यात आले. या त्रिकुटाच्या जागी नियोजित कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू जयंत यादव आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली.
अजिंक्य, इशांत, जडेजाला वगळण्यामागे दुखापतींचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, एकाच वेळी तीन क्रिकेटपटू इंज्युअर्ड दाखवल्याने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन टीकेचे लक्ष्य बनले आहे. उपकर्णधार रहाणे हा स्नायू दुखापतीमुळे (हॅमस्ट्रिंग) त्रस्त असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. इशांतच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. जडेजाचा उजवा हात दुखत आहे. कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रहाणेला दुखापत झाली. त्याच दिवशी इशांतच्या बोटावर जोरात चेंडू आदळला होता, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. मात्र, पहिल्या कसोटीमध्ये पाचव्या आणि अंतिम दिवशी संपूर्ण वेळ अजिंक्य मैदानावर उपस्थित होता. त्याने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना कर्णधारपद सांभाळले होते. स्नायू दुखावल्याची त्याने कुठलीही तक्रार केली नव्हती. तसेच सामन्यानंतरही अशी कोणती माहिती समोर आली नाही. कहर म्हणजे रहाणे फलंदाजीचा सराव करत असल्याचे फोटो बीसीसीआयने २ डिसेंबरला शेअर केले होते.
पाचव्या दिवशी पहिल्याच चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना ईशांतला दुखापत झाली, पण त्यानंतर त्याने दिवसभर क्षेत्ररक्षण केले. गोलंदाजीही केली. दुखापत झाली असती, तर दिवसभर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा धोका का पत्करला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पहिल्या कसोटीदरम्यान इशांतप्रमाणे जडेजालाही दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे जडेजाने दोन्ही डावात दमदार फलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात प्रभावी गोलंदाजी करताना संघाला विजयासमीप नेले. मग दुखापत कधी झाली? जडेजाचा हात खूप दुखत असून तो बॅटही उचलू शकत नाही, असे नाणेफेकीवेळी कर्णधार कोहलीने सांगितले.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…