विरारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे कोडे उलगडले

  69



नालासोपारा (वार्ताहर) : काही दिवसांपूर्वी विरारमधील ग्लोबल सिटी या परिसरामध्ये जेट्टी बंदर येथे एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर या खुनाचे गूढ उलगडले आहे. सदर महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.


विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी येथे सापडलेल्या मृतदेहाचे ओळख पटली असून तिचे नाव रेश्मा खड्ये (२५) होते. रेश्मा विरार पूर्व गांधीनगर येथे राहत होती. २५ तारखेला नेहेमीप्रमाणे ती कामावर जाण्यास निघाली होती. त्यानंतर तिचा फोन लागत नसल्याने आणि दोन दिवस ती घरी परतली नसल्याने २७ तारखेला तिची बेपत्ता असण्याची तक्रार तिच्या घरच्यांनी विरार अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या आधारे शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह सापडला.


रेश्मा नोकरी करत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हर्षल पाटील हा तरुण तिला छळत होता. काही महिन्यांपूर्वी रेश्माचे लग्न हर्षल याच्याशी लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु काही कारणास्तव लग्न तुटले होते.

Comments
Add Comment

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा