विरारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे कोडे उलगडले



नालासोपारा (वार्ताहर) : काही दिवसांपूर्वी विरारमधील ग्लोबल सिटी या परिसरामध्ये जेट्टी बंदर येथे एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर या खुनाचे गूढ उलगडले आहे. सदर महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.


विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी येथे सापडलेल्या मृतदेहाचे ओळख पटली असून तिचे नाव रेश्मा खड्ये (२५) होते. रेश्मा विरार पूर्व गांधीनगर येथे राहत होती. २५ तारखेला नेहेमीप्रमाणे ती कामावर जाण्यास निघाली होती. त्यानंतर तिचा फोन लागत नसल्याने आणि दोन दिवस ती घरी परतली नसल्याने २७ तारखेला तिची बेपत्ता असण्याची तक्रार तिच्या घरच्यांनी विरार अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या आधारे शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह सापडला.


रेश्मा नोकरी करत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हर्षल पाटील हा तरुण तिला छळत होता. काही महिन्यांपूर्वी रेश्माचे लग्न हर्षल याच्याशी लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु काही कारणास्तव लग्न तुटले होते.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.