मुंबई : भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला लढावे लागेल. सर्व प्रादेशिक पक्ष एकजूट झाले तर भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्या भेटणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला.
ममता गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. राहुल गांधींचे नाव न घेता ममतांनी त्यांच्यावर टीका केली. एखाद्याने काहीच करायचे नाही आणि फक्त विदेशात राहायचे. अशाने काम कसं चालेल? तुम्ही फिल्डवर राहणार नाही, तर भाजप तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्ड रहाल तर भाजपचा पराभव होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
काँग्रेस आणि डावे आपल्याविरोधात विधानसभा निवडणुकीत लढू शकतात तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो.
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…