पावसाळी औषध खरेदीची फाईल महापौर दालनातून गायब

  82

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनातून पावसाळी औषध खरेदी प्रस्तावाची फाईल गहाळ झाली आहे. यामुळे भाजपकडून आता एनसीबीकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे भाजप आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.


पावसाळी औषधांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी महापौरांच्या दालनात पाठवण्यात आला होता. यात मलेरिया, डेंग्यूच्या आजारांवरील औषधांचा समावेश होता. मात्र ही फाईल महापौर कार्यालयातून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. १४ महिन्यांत १८ वेळा रिमाइंडर देण्यात आले आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले आहे. तरीही या फाईलीबाबतची कार्यवाही झाली नाही. एवढ्या वेळा रिमाइंडर देऊनही महापौरांच्या कार्यालयामधून फाईल गायब झाल्या आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे मिहीर कोटेचा यांनी म्हटले आहे.


दरम्यान या सर्व टेंडरच्या फायली असून गायब होण्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहे का? असा सवाल देखील कोटेचा यांनी केला आहे. आर्थिक गणितांची जुळवाजुळव किंवा देवाणघेवाण न झाल्याने या फायली गायब करण्यात आल्यात का? असा सवाल करतानाच या फायली गायब करणारा महापालिकेतील वाझे कोण? असा सवालही कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान आता हे प्रकरण महापौरांना अडचणीत टाकणार असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर