लवकरच ‘रहाणे’ फॉर्ममध्ये परतेल

  67

कानपूर (वृत्तसंस्था) : कानपूर कसोटीत भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्यामुळे रहाणेच्या मुंबई कसोटीतील संघातील संधीबाबत चर्चा होत आहे. मात्र नवा प्रशिक्षक राहुल द्रविड रहाणेच्या पाठीशी आहे. रहाणेच्या खराब फॉर्मची द्रविडला चिंता नाही. लवकच रहाणे फॉर्ममध्ये परतेल असे द्रविड म्हणाला.


कानपूर कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर आणि विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात आल्यानंतर अजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीत स्थान मिळेल का? या प्रश्नावर द्रविडने आपले मत मांडले. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत द्रविडला जेव्हा रहाणेचा सध्याचा फॉर्म संघाची चिंता वाढवणार आहे का?, असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘‘यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही. साहजिकच अजिंक्यने तुमच्यासाठी जास्त धावा केल्या पाहिजेत, त्यालाही तेच हवे आहे.”


द्रविड पुढे म्हणाला, “रहाणे एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने गेल्या काही वर्षांत भारतासाठी कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. तो अशा लोकांपैकी एक आहे, ज्यांच्याकडे प्रतिभा आणि अनुभव दोन्ही आहे. ही फक्त एका सामन्याची बाब आहे.”


कानपूर कसोटीत शेवटच्या दिवशी भारताला शेवटच्या ५२ चेंडूंमध्ये एक विकेट घेता आली नाही. त्यामुळे हा कसोटी सामना ड्रॉ झाला. या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविडला रहाणेच्या खराब फॉर्मची चिंता नाही. त्याने रहाणेचा बचाव करत तो लवकरच फॉर्ममध्ये परतणार असल्याचे म्हणाला.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली पुनरागमन करेल. त्यामुळे रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी कानपूर कसोटीचा नायक श्रेयस अय्यरला वगळले जाईल का? यावर द्रविड म्हणाला, “आम्ही सध्या आमची प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे ठरवलेले नाही. आमचे लक्ष फक्त कानपूर कसोटीवर होते. आम्ही मुंबईला गेल्यावर परिस्थितीची चाचणी घेऊ आणि उपलब्ध खेळाडूंच्या फिटनेसची माहिती गोळा केल्यानंतरच निष्कर्ष काढू. कोहलीही संघात सामील होणार आहे. त्यामुळे त्याच्याशीही बोलावे लागेल. त्यानंतरच निर्णय घ्यावा लागेल.” असे द्रविड म्हणाला.

Comments
Add Comment

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १०

युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,