धमकीला भीक घालत नाही : गौतम गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.



गौतम गंभीर यांना तीन धमकीचे मेल आले आहेत. या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असेही त्या मेलमध्ये लिहीले आहे. आता, गौतमनेही या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे म्हटले आहे.



गौतम गंभीरने आपण कुठल्याही धमकीला भीत नसून तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. मी माझे काम थांबवणार नाही, कार्यक्रमांमध्ये मी भाग घेतच राहिल, असे गंभीरने म्हटले आहे. तसेच, सध्या माझे लक्ष दिल्ली प्रीमीयर लीगवर आहे. युमना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या स्पर्धेच्या यशस्वीतेवर माझे लक्ष असल्याचेही गंभीरने म्हटले आहे. दरम्यान, गौतम गंभीर काश्मीरमधील शहिदांच्या कुटुंबीयांना सातत्याने मदत करत असतो. तसेच, येथील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही तो पार पाडतो.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या