धमकीला भीक घालत नाही : गौतम गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.



गौतम गंभीर यांना तीन धमकीचे मेल आले आहेत. या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असेही त्या मेलमध्ये लिहीले आहे. आता, गौतमनेही या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे म्हटले आहे.



गौतम गंभीरने आपण कुठल्याही धमकीला भीत नसून तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. मी माझे काम थांबवणार नाही, कार्यक्रमांमध्ये मी भाग घेतच राहिल, असे गंभीरने म्हटले आहे. तसेच, सध्या माझे लक्ष दिल्ली प्रीमीयर लीगवर आहे. युमना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या स्पर्धेच्या यशस्वीतेवर माझे लक्ष असल्याचेही गंभीरने म्हटले आहे. दरम्यान, गौतम गंभीर काश्मीरमधील शहिदांच्या कुटुंबीयांना सातत्याने मदत करत असतो. तसेच, येथील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही तो पार पाडतो.

Comments
Add Comment

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा

ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी

नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद

आशिया कप ट्रॉफीवरून रणसंग्राम: BCCI vs नक्वी, ट्रॉफीचा तिढा सुटत नाही!

नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची ट्रॉफी सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई

IND vs AUS: कर्णधार शुभमन गिलचा मोठा डाव; 'या' धुरंधराची एंट्री निश्चित! ऑस्ट्रेलिया संघातही मोठे बदल

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ, विशेषतः अ‍ॅडलेड येथे होणाऱ्या

केशव महाराजाचा रावळपिंडीत ऐतिहासिक विक्रम! पाकिस्तानविरुद्ध ७ बळी घेऊन रचला इतिहास

रावळपिंडी: दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर