मुंबई (प्रतिनिधी) : स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येत समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, संगीत, हळद आणि वरात असा सगळा थाट लग्नात पाहायला मिळेल.
नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. तर जयदीपही धोतर, फेटा अशा पारंपरिक लूकमध्ये दिसणार आहे. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात. त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे. या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे. जयदीप गौरीच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…