विरोधकांच्या प्रचंड गदारोळात संसदेत तिन्ही कृषी कायदे रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या उभय सभागृहात सोमवारी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे चर्चा न होताच हे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर झाले. आता ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. संसदेचे हिवाळी अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले. अधिवेशनाची सुरुवातच गोंधळ आणि गदारोळाने झाली. त्यानंतर लोकसभा १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.


विरोधकांच्या प्रचंड गदारोळात संसदेत वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे रद्द झाले. तिन्ही कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेप्रमाणे विरोधकांच्या गदारोळातच राज्यसभेतही मंजूर झाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायदे रद्द करून सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी पंजाब, हरयाणा आणि यूपीतील अनेक शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करण्यात येत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत तिन्ही कृषी कायदे रद्द करणारे विधेयक मंजूर झाल्याने ते आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल.


कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी वादग्रस्त कृषी कायदे रद्द करणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले. विरोधकांच्या गदारोळात लोकसभेत कृषी कायदे रद्द करणारे विधेयक मांडले गेले आणि मंजूरही झाले. दुपारी १२ वाजता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक ठेवले. त्यानंतर केवळ चारच मिनिटांत हे विधेयक मंजूर करण्यात आले. दुसरीकडे या विधेयकावर चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधी पक्ष कमालीचे आक्रमक झाले. सरकारने ही मागणी मान्य न केल्याने जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर लोकसभा पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. नंतर २ वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. त्यावेळी देखील विरोधी पक्ष चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे पुन्हा गदारोळ झाला आणि लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केले.


असेच चित्र राज्यसभेतही होते. राज्यसभेत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील वर्षी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आणखी नुकसान होऊ शकते, हा धोका ओळखून सरकारने हे विधेयक आणले’, असे खर्गे म्हणाले. तर ‘आम्ही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समजवण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी मोठेपणा दाखवला आणि कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला’, असे कृषिमंत्री तोमर म्हणाले.

Comments
Add Comment

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण

मोबाईल गेमची सवय जीवघेणी ठरली, पॉप्युलर गेम खेळताना मुलाचा प्राण गेला

लखनऊ: मोबाईल गेमच्या व्यसनामुळे एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

Garib Rath Express Fire : गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग! 'ज्वाळा' पाहून प्रवाशांना फुटला घाम; अनेकजण जखमी, रेल्वेने दिली 'ही' माहिती

अमृतसर : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आज, शनिवारी, सकाळी अचानक मोठा गोंधळ आणि अफरातफरी माजली. लुधियानाहून

Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने

'अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक', संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार

नाशिक: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या 'तेजस एमके 1 ए' च्या