नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन शांततेत चालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आवाहन केले. अधिवेशन सुरू होण्याआधी मोदींनी संसदेच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. संसदेचे हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
‘देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे संसदेचे हे अधिवेशन आणि येत्या अधिवेशनात देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भावनेनुसार देशाच्या प्रगतीसाठी चर्चा व्हावी, अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा अाहे’, असे ते म्हणाले. अशा स्थितीत हे सत्र दूरगामी परिणामांसह विचारांचे, सकारात्मक निर्णय घेणारे ठरते. संसद कशी चालवली गेली आणि किती चांगली चालवली गेली… हे भविष्यात लक्षात ठेवले जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकार प्रत्येक मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी तयार आहे. प्रत्येक प्रश्नोत्तरे व्हावीत आणि संसद शांततेत चालावी, सरकारच्या धोरणांविरुद्ध विरोधक आक्रमक होऊ शकतात. पण यावेळी त्यांनी संसदेची आणि सभापतींची प्रतिष्ठा राखावी. सर्वांनी संसदेत योग्य वर्तन करावे, ज्यामुळे देशातील पुढील तरुण पिढ्यांना ते कामी येईल, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…