Friday, April 25, 2025
Homeक्रीडावाड्यातील दोन मुलींची पालघर खो-खो संघात निवड

वाड्यातील दोन मुलींची पालघर खो-खो संघात निवड

वाडा (वार्ताहर) : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पालघर जिल्ह्याच्या संघात वाडा तालुक्यातील दोन मुलींची निवड झाली आहे. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वृषाली कवठे व अंकिता हिरकुडा यांची पालघर जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे.

यापूर्वी देखील स्वामी विवेकानंद शाळेतील सरिता शनवारे, दक्षता प्रधान, उज्ज्वला मुकणे व प्रणाली कोलेकर यांनी राज्यस्तरावर सहभाग नोंदवला आहे. सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत वाड्यातील या मुली पालघर जिल्ह्याच्या वतीने खेळणार आहेत.

निवड झालेल्या या खेळाडूंवर वाडा तालुक्यातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खेळाडूंना शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस भ. भा. जानेफळकर यांचा पाठिंबा, शाळेचे मुख्याध्यापक बा. ज. शिंदे व क्रीडा शिक्षक राकेश ठाकरे, हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -