विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच

  48

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सलग दुसऱ्या वर्षीही नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचे स्वरूप तसेच त्यांच्या प्रकृतीचा विचार करता हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळते. येत्या २९ तारखेला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात यावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब केले जाईल. त्याचबरोबर हे अधिवेशन कधी, किती दिवस तसेच कोणत्या तारखांना घ्यायचे हेही यावेळी निश्चित केले जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे अधिवेशन फक्त एकाच आठवड्याचे असणार असून ते २२ ते २९ डिसेंबर या काळात घेण्याचे ठरत आहे.


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत झाले होते. ते संपतानाच पुढचे म्हणजेच हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ते नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले होते.

Comments
Add Comment

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता.

Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळात १५ महत्त्वाचे निर्णय, मुंबई-ठाणे-मेट्रो प्रकल्पांना गती, सविस्तर वाचा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (दि. ३ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.