विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच

Share

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सलग दुसऱ्या वर्षीही नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचे स्वरूप तसेच त्यांच्या प्रकृतीचा विचार करता हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळते. येत्या २९ तारखेला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात यावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब केले जाईल. त्याचबरोबर हे अधिवेशन कधी, किती दिवस तसेच कोणत्या तारखांना घ्यायचे हेही यावेळी निश्चित केले जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे अधिवेशन फक्त एकाच आठवड्याचे असणार असून ते २२ ते २९ डिसेंबर या काळात घेण्याचे ठरत आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत झाले होते. ते संपतानाच पुढचे म्हणजेच हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ते नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले होते.

Recent Posts

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…

9 minutes ago

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

55 minutes ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

2 hours ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

2 hours ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

3 hours ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

4 hours ago