निर्मला सीतारामन यांची न्हावा-शेवा बंदराला भेट

  94

रायगड (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्हावा-शेवा बंदराला भेट देऊन भारतीय सीमाशुल्क विभागाच्या कामांचा आढावा घेतला.


यावेळी सीमाशुल्क क्लियरन्स प्रक्रिया आणि त्यात सीमाशुल्क विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत अलीकडेच राबवलेल्या उपक्रमांची माहिती अर्थमंत्र्यांना दिली. गेल्या काही काळात, सीबीआयसीने तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले आहेत. यात आयातीसाठी आवश्यक कागदपत्रे आधीच ऑनलाइन पद्धतीने सादर करणे, ई-संचितच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्याची सुविधा, मालाची ऑनलाइन नोंदणी, तसेच सीमाशुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची व्यवस्था, सीमाशुल्क कागदपत्रांचे डिजिटलीकरण आणि आयातीचे स्वयंचलित क्लियरन्स इत्यादी सुधारणांना जोड म्हणून, सीबीआयसीने लॉजिस्टिक साखळी सुधारण्यासाठीदेखील सक्रियपणे उपाययोजना केल्या आहेत. यात उत्तम अशी एक्स रे स्कॅनर व्यवस्था आणि आरएफआयडी टॅग आणि कंटेनर्स ट्रॅकिंग व्यवस्था यांचा समावेश आहे. सीबीआयसीने केलेल्या या सुधारणा/उपक्रमांमुळे उद्योगपूरक वातावरणनिर्मिती, अनुपालनाचा भार कमी होणे तसेच एकूणच माल सोडवण्याच्या प्रक्रियेत वेळेची बचत होत आहे.


अर्थमंत्र्यांनी व्यापार सुलभीकरणाच्या क्षेत्रात सीमाशुल्क विभागाने उचललेल्या विविध कामांचा आढावा घेतला. आयात-निर्यात कागदपत्रांच्या छाननीची दैनंदिन प्रलंबित प्रकरणे शून्यावर यावीत, मालाच्या पाठवणीची आणि स्वीकृतीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी प्रशासन बळकट करावं आणि विविध प्रक्रियांमध्ये समन्वय वाढवावा, अशा सूचना सीतारामन यांनी दिल्या आहेत. निर्यात प्रोत्साहन योजनांच्या प्रक्रियेवरही त्यांनी भर दिला. २५ जानेवारी २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवसानिमित्त केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने देशव्यापी जनजागृती आणि जन संपर्कविषयक कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना सीतारामन यांनी केली. यावेळी महसूल सचिव तरुण बजाज, अध्यक्ष एम. अजित कुमार, सीमाशुल्क विभाग मुख्य आयुक्त एम. के. सिंह उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील