अज्ञाताने जाळले हजारो भाताचे भारे

  39

वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील गौरापूर येथील शेतकरी निलम म्हात्रे यांच्या खळ्यावरील रचून ठेवलेल्या भाताच्या भाऱ्यांना रात्रीच्या सुमारास अज्ञाताने आग लावल्याने सर्व भारे जाळून राख झाले आहेत.


शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास म्हात्रे यांच्या खळ्यावरील भाताच्या भाऱ्यांना आग लागली असल्याची माहिती गौरापूर येथील नागरिक प्रमोद हरड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी इतर गावकऱ्यांना घेऊन शेताकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र रचलेले सुमारे एक हजार पन्नास भारे आगीत भस्म झाले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शेजारचे तीनशे, चारशे भारे थोड्या अंतरावर असल्याने ते बचावले आहेत.


यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला असला तरी म्हात्रे यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी खूप आटापिटा करून काही भात वाचवले होते; परंतु कुणी अज्ञात इसमाने या भाऱ्यांना चारही बाजूने आग लावल्याने यातील सर्व भाताचे भारे जळून गेले गेले. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती हरड यांनी दिली.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर