नरेश कोळंबे
कर्जत : कर्जत येथे उल्हास नदीवर त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून उल्हास नदी निर्मल जल अभियान यांच्या वतीने उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर उल्हास दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात दिव्यांची आरास केल्याने उल्हास नदीचे एक वेगळे रूप यावेळी पाहायला मिळाले.
त्रिपुरारी पौर्णिमेला हिंदू संस्कृतीत महत्वाचे मानले गेले आहे. म्हणूनच या दिवशी लोक अनेक दिव्यांची रोषणाई करत असतात. कर्जत मधील उल्हास नदी ही जीवनदायिनी आहे, अनेक शेतकरी ह्या पाण्यावर अवलंबून आहेत परंतु गेल्या काही वर्षात ह्या नदीने आपले सौंदर्य गमावले आहे म्हणुनच ती स्वच्छ ठेवली पाहिजे आणि त्या नैसर्गिक जलस्त्रोताचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी उल्हास दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
हा दीपोत्सव उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर करण्यात आला. यावेळी १५०० हून अधिक दीप समस्त कर्जतकरांनी उल्हास नदीकिनारी प्रज्वलित केले होते. हे दीपोत्सवाचे दुसरे वर्ष असल्याचे, उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे समीर सोहोनी यांनी सांगितले.
यावेळी दीपोत्सवास कर्जत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी उपस्थिती दर्शवली.
तसेच भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेले फ्रेंच नागरिक मिस्टर क्विंटन हे सुद्धा दीपोत्सवास उपस्थित होते. त्यांनी उल्हास नदी निर्मल अभियानाचे समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांच्या या नदी बचाव कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी…
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…