राज्यपालांच्या हस्ते संजय भुस्कुटे सन्मानित

  39

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील राजभवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार, सूत्रसंचालक संजय भुस्कुटे यांना ‘एन्जेल कम्युनिकेटर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोविड कालावधीत पर्यावरणविषयक जनजागृतीत व रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर केलेल्या समाजोपयोगी कामाबद्दल संजय भुस्कुटे यांना सन्मानित करण्यात आले.


पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. कोविड साथीमुळे गेले दीड वर्षे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले होते; परंतु या महामारीत विविध क्षेत्रांतील काही लोकांनी समाजसेवेच्या माध्यमांतून आपले काम सुरू ठेवले होते. पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने ‘एन्जेल कम्युनिकेटर’ पुरस्कार प्रदान करून अशा काही मान्यवरांचा सन्मान केला.


या वेळी नर्गिस दत्त फांऊडेशनच्या अध्यक्ष व माजी खासदार प्रिया दत्त, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर, टाटा हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुदीप गुप्ता व डॉ. शैलेश श्रीखंडे या मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात आले. संजय भुस्कुटे यांना यापूर्वी मटा सन्मान, सह्याद्री लक्स माणिक ॲवार्ड, रायगड भूषण, पत्रकारिता क्षेत्रातील रॅपा ॲवार्ड अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.