ही असंवेदनशीलतेची परिसीमा

Share

मालेगाव-अमरावतीतल्या दंगल प्रकरणी चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांची कातडी इतकी टणक आहे की आता गेंड्यालाही तो संवेदनशील असल्याचे वाटू लागले आहे. मनाला यातना देणाऱ्या घटना येथे वारंवार घडत आहेत. पण सरकारला त्याचे काही वाटेनासेच झाले आहे. मालेगाव-अमरावतीत झालेल्या दंगलींचे ज्या पद्धतीने सरकारमधले लोक समर्थन करतात ते पाहिले तर ही असंवेदनशीलतेची परिसीमा म्हणावी लागेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामूहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही,  इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. जवळजवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात.  त्यासाठी पंधरा–वीस हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात, याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तर हे भाजपवर आरोप करतात. अंमली पदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असे पाटील म्हणाले.

राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपचा सक्रीय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्त्व करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ठाकरे सरकार गुन्हेगारांचे समर्थक’

ठाकरे सरकार गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे आणि अराजकता माजवणाऱ्यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्याविरोधात भाजप संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा, अशा शब्दांत आमदार आशीष शेलार यांनी राज्यातल्या ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणीसारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर प्रथम गुन्ह्यांने समर्थन करण्यात आले तर पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर आतंकवादाचे समर्थन करण्यात आले. आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे, असे ते म्हणाले.

Recent Posts

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

7 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

18 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

26 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

35 minutes ago

Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…

36 minutes ago

Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…

37 minutes ago