दिल्लीपाठोपाठ मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

Share

मुंबई : हिवाळ्यात थंड, निरोगी हवेमुळे वातावरण आरोग्यदायी ठरते. मात्र मुंबईत सध्या काहीचे विपरीत चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत दिवसाच्या तापमानात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. दिवसाचे तापमान 35.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या तापमानासोबतच मुंबईच्या हवेची गुणवत्ताही घसरल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 एक्यूआय आणि पाडव्याच्या दिवळी 221 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली होती.

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील किमान तापमान 20 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते. मुंबईत हिवाळ्याची सुरुवात झाल्याची जाणीवही झाली होती. मात्र रविवारी किमान आणि कमाल तापमानात अचानक वाढ झाली. सोमवारी शहराचे कमाल तापमान 32.8 अंश
सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 35.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. तर शहराचे किमान तापमान 25 अंश सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 24.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले.

मुंबईत कुलाब्यात सर्वाधिक 345 एक्यूआय एवढी प्रदुषित हवा असल्याची नोंद झाली आहे. तर त्यानंतर माझगावमध्ये 325, बीकेसीमध्ये 314 आणि मालाडमध्ये हवेची गुणवत्ता 306 एक्युआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेची ही गुणवत्ता सर्वात घातक गटातील आहे. तसेच अंधेरीमध्येही हवेची गुणवत्ता 259 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जास्त असल्यास, अशी हवा आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अस्थमा किंवा श्वासासंबंधी आजार असलेल्या रुग्णांनी तसेच लहान मुले व ज्येष्ठांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

हवामानातील बदलांचे आकलन करणारी संस्था स्कायमेटमधील हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्येकडून उष्ण हवेचे प्रवाह सुरु झाले आहेत. त्यामुळे शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. आता 21 किंवा 22 नोव्हेंबरनंतरच तापमानात काहीशी घसरण पहायला मिळेल. तसेच कर्नाटकच्या किनारी भागात एक वादळसदृश स्थिती तयार होत असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारी भागात म्हणजेच मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट संस्थेचे प्रमुख हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी सांगितले.

Recent Posts

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

6 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

17 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

25 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

34 minutes ago

Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…

36 minutes ago

Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…

36 minutes ago