रझा अकादमीला कसे संपवायचे ते बघू : आमदार नितेश राणे

Share

मुंबई (प्रतिनिधी): राज्यभरात दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रझा अकादमीवर सरकारने बंदी आणावी. सरकारला हे शक्य नसेल तर रजा अकादमीला कसे संपवायचे हे आम्ही बघून घेऊ, असा इशारा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

प्रभादेवी येथे भाजपच्यावतीने आयोजित मराठी कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला भाजप नेते विनोद तावडे, नितेश राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्रिपुरामधील घटनेनंतर राज्यात नांदेड येथे काढलेल्या मोर्चाला रजा अकादमीच्या वतीने हिंसक वळण देण्यात आले. रजा अकादमीला कोणाची साथ आहे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. रजा अकादमीने केलेल्या हिंसक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर अमरावतीत लाठीचार्ज करण्यात आला. मात्र, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून व शांतता पसरवणाऱ्या रजा अकादमीवर बंदी आणावी, अशी आम्ही मागणी करतो आहोत. राज्य सरकारने बंदी आणली नाही तर रजा अकादमीला कसे संपवायचे. हे आम्ही बघून घेऊ. मनीष मार्केटमध्ये असलेल्या त्यांच्या कार्यालयात त्यांचे काय करायचे, हे आम्ही पाहून घेऊ, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला फटकारले.

दरम्यान सचिन शिंदे यांनी आयोजिलेल्या या भव्य मराठी कट्टा कार्यक्रमात भाजपच्यावतीने मराठी माणसाला जागरूक करण्याचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभादेवी विभागात इथल्या स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी स्वतःचे फ्लॅट घेण्यापलीकडे काही केले नाही. अशा लोकांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून येत्या महानगरपालिकेत मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हटवून भाजपाला मदत करण्याचे आवाहन माजी मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केले. प्रभादेवी इथल्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचे नाव लिहिलेले नाही. त्यामुळे वर बापाला आणि खाली मुलाला मत दिलेच पाहिजे, असा काही नियम नाही. एकदा भाजपवर विश्वास ठेवून कमळा पुढील बटन दाबा, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.

Recent Posts

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद

ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…

5 minutes ago

घनदाट जंगलात ४८ तासांपासून सुरू आहे गोळीबार, सुरक्षा पथकाने अखेर घेरलंच

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…

18 minutes ago

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

33 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

58 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

1 hour ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

2 hours ago