खेड (प्रतिनिधी) : कोकणवासीयांनी पाहिलेले मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे स्वप्न पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार याचे उत्तर मिळणे बाकी असले तरी खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही बोगद्यांची खोदाई आरपार पूर्ण झाली आहे. बोगदा पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मुंबई ते गोवा महामार्गावरील चौपदरी रस्ते व पूल उभारणीची प्रतीक्षा असताना कशेडी बोगद्यांची खोदाई पूर्ण झाल्याची ‘शुभवार्ता’ कोकणवासीयांना नक्कीच सुखावणारी आहे.
महामार्गावरील चौपदरीकरण बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच टोलनाके उभे राहिले आहेत. महामार्गावर वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरण कामाच्या दहा टप्प्यांतील अवघे तीन टप्पे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, सात टप्पे अपूर्णावस्थेत आहेत. पूर्ण होत असलेल्या टप्प्यात खेड तालुक्यातील कशेडी ते परशुरामचा समावेश आहे.
कोकण रेल्वेनंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे स्वप्न कोकणवासीयांनी पाहिले होते. या महामार्गासाठी निधीची घोषणा झाल्यानंतर दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र चार वर्षे होत आली तरी अर्धा महामार्गही पूर्ण झाला नाही. उलट त्यानंतर जाहीर झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईतून कोकणात अगदी गोव्यात जाताना वाहनचालकांना अवघड घाटांसह खाचखळग्यांतून अनेक वर्षे प्रवास करावा लागत होता. या मार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी ६ हजार १०० कोटी रुपये कंत्राटदारांसाठी तरतूद केली गेली. या महामार्गावरील उड्डाण पूल, नद्यांवरील १४ पूल, कशेडी बोगदा यासाठीही वेगळी तरतूद करण्यात आली. सन २०१७ ते २०१८ या कालावधीत प्रत्यक्ष या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली. त्यावेळी डिसेंबर २०१९ मध्ये या महामार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु ते झाले नाही. त्यानंतर कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प झाली होती. त्याचाही परिणाम या महामार्गाच्या चौपदरीकरणावर झाला.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…